Showing posts with label 19may. Show all posts
Showing posts with label 19may. Show all posts

Friday, 19 May 2023

19 मे दिनविशेष - उद्योजक जमशेदजी टाटा स्मृतिदिन

19 मे दिनविशेष - उद्योजक जमशेदजी टाटा स्मृतिदिन
जन्म - ३ मार्च १८३९ (नवसारी,गुजरात)
स्मृती - १९ मे १९०४


टाटा उद्योगसमूहाचे संस्थापक जमशेदजी नसरवानजी टाटा यांचा जन्म नवसारी, गुजरात येथे झाला. ‘टाटा’ हे नाव आज भारतीय उद्योगजगतात कल्पकता, उपक्रमशीलता, सचोटी आणि संपूर्ण व्यावसायिकता यांच्याशी समानधर्मी असे मानले जाते. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी टाटा उद्योगसमूहाची भक्कम पायाभरणी करणारे जमशेटजी टाटा यांनी अठराव्या शतकाच्या अखेरीस गुजरातच्या नवसारी नावाच्या एका छोट्याशा खेड्यात एक लहानसं रोपटं लावलं. आता या रोपट्याचा वटवृक्ष झालाय, त्याचं नाव टाटा उद्योग समूह. इतक्या वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द असलेला हा देशातला एकमेव उद्योग समूह असावा. जमशेदजींना उद्योगधंद्याची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. अर्थातच घरच्यांचा विरोध पत्करुन स्वत:चं नशीब आजमावायला ते मुंबईत आले तो काळ अत्यंत खडतर होता. कारण नुकताच ब्रिटीश सरकारने १८५७ चा उठाव चिरडला होता. ग्रॅज्युएट झालेल्या जमशेदजींना युरोप, इंग्लंड, अमेरिका येथे जाऊन आल्यावर समजलं की इंग्लंडचं वर्चस्व असलेल्या कापड उद्योगात खरंतर भारतानं मुसंडी मारली तर प्रचंड संधी उपलब्ध होतील. त्यादृष्टीने त्यांनी पावलं उचलायला सुरुवात केली. सुरुवातीला एकवीस हजार रुपये भांडवल गुंतवून जमशेदजींनी त्यांची पहिली कंपनी स्थापन केली. पुढे काही बंद पडलेल्या तेल गिरण्या, कापड गिरण्या विकत घेऊन, विकून त्यांनी उद्योग वाढवण्यास प्रारंभ केला. 


जमशेदजींना चार क्षेत्रांत स्वतःचा आणि अर्थातच भारताचा ठसा निर्माण करायचा होता - पोलाद कारखाने, अग्रेसर शिक्षणसंस्था, भारतातील सर्वोत्कृष्ट हॉटेल आणि जलविद्युत केंद्र. ज्यापैकी फक्त एक स्वप्न पूर्ण झालेले ते स्वत: पाहू शकले. ते स्वप्न म्हणजे 'द ताजमहल पॅलेस हॉटेल’. त्या काळातील बेचाळीस कोटी रुपये खर्च करुन ३ डिसेंबर १९०३ रोजी उद्घाटन झालेले 'ताजमहल' हे वीज वापरणारे देशातले पहिले हॉटेल होते. बाकी स्वप्न दोराबजी टाटा आणि रतन टाटा या त्यांच्या चिरजीवानी पूर्ण केली. 


आज टाटा गृपच्या १०० कंपन्या जगाच्या सहा खंडांतील ऐंशी देशांत कार्यरत आहेत. त्यातल्या काही मोठ्या कंपन्या म्हणजे टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा पॉवर, टाटा केमिकल्स, टाटा ग्लोबल बिव्हरेजेस, टाटा टेलिसर्व्हिसेस, टायटन इंडस्ट्रीज, टाटा कम्युनिकेशन्स आणि ताज हॉटेल्स. एके वर्षी टाटांच्या एका कंपनीत लहान मुलांसाठी एक स्पर्धा ठेवण्यात आली होती. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण वापरत असलेल्या वस्तूंची नावे लिहायची होती. त्यातली प्रत्येक वस्तू टाटाचे उत्पादन आहे का नाही ते शोधायचे होते. गंभीरपणे विचार केला तर खरोखरच मीठापासून गाडीपर्यंत प्रत्येक वस्तूच्या उत्पादनात टाटाचा हात आहे.

19 मे दिनविशेष - राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी जन्मदिन

19 मे दिनविशेष - राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी जन्मदिन
जन्म - १९ मे १९१३ (अनंतपूर,आंध्रप्रदेश)
स्मृती - १ जून १९९६

भारताचे सहावे राष्ट्रपती आणि आंध्रप्रदेशचे पहिले मुख्यमंत्री नीलम संजीव रेड्डी यांचा जन्म आंध्रप्रदेशातील इल्लूर (जि.अनंतपूर) येथे झाला. त्यांना स्वातंत्र्य चळवळीतील एक निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील नीलम चिनप्पा रेड्डी हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते. संजीव रेड्डींचे सुरुवातीचे शिक्षण अड्यार येथील थिऑसॉफिकल शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी अनंतपूरच्या कला महाविद्यालयातून उच्च शिक्षण घेतले. शिकत असतानाच ते युवक काँग्रेसकडे आकर्षिले गेले. १९३१ मध्ये त्यांनी शिक्षण अर्धवट सोडून महात्मा गांधींच्या असहकार चळवळीत उडी घेतली. यासाठी त्यांनी अनेकदा तुरुंगवासही भोगला. मधल्या काळात त्यांनी मिळेल ती नोकरी केली. तथापि, कुठेही ते कायम नोकरीत रमले नाहीत. नंतरच्या काळात ते आंध्र प्रांतिक काँग्रेसचे सचिव झाले. तत्पूर्वी त्यांचा नागा रत्नम्मा यांच्याबरोबर विवाह झाला. त्यांना २ मुले व ३ मुली अशी अपत्ये झाली. पैकी एक मुलगा बालपणीच अपघातात मृत्युमुखी पडला. महात्मा गांधीजींनी सुरू केलेल्या अनेक आंदोलनांत त्यांनी सर्वस्व झोकून भाग घेतला. सविनय कायदेभंगाची चळवळ आणि भारत छोडो आंदोलनात त्यांना प्रदीर्घ तुरुंगवास झाला. १९४६ मध्ये त्यांची तत्कालीन मद्रास प्रांताच्या विधानसभेवर निवड झाली. भारतीय संविधान समितीचेही ते सदस्य होते. 


स्वातंत्र्योत्तर काळात मद्रासच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपद भूषवले. त्यानंतर ते आंध्र प्रांतिक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीत त्यांची निवड झाली. याबरोबरच त्यांची लोकप्रियता वाढली. ऑक्टोबर १९५६ च्या राज्य पुनर्रचनेनंतर नव्याने तयार झालेल्या आंध्र प्रदेश राज्याचे पहिले मुख्यमंत्री ते बनले. यानंतर अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाली. त्यांच्या कार्यकाळात काँग्रेसची तीन अधिवेशने झाली. लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असताना पोलाद व खाणकाम खात्याचे मंत्री म्हणून त्यांना मंत्रिमंडळात घेण्यात आले. १९६७ पर्यंत राज्यसभेचे ते सदस्य राहिले. जानेवारी १९६६ ते मार्च १९६७ दरम्यान इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात पर्यटन मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. 


१९६७ मध्ये पुन्हा ते लोकसभेवर निवडून आले. त्यांची लोकसभेचे सभापती म्हणून निवड झाली. निःपक्ष सभापती म्हणून ते लोकप्रिय झाले. राष्ट्रपतिपदासाठी त्यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिला. तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसमध्ये ऐतिहासिक फूट पडून जुनी व नवी काँग्रेस असे दोन गट झाले होते. इंदिरा गांधींचा पाठिंबा असलेले व्ही.व्ही. गिरी यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाली. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीचा प्रयत्न केला. परंतु पदरी पराजय पडला. नंतर मात्र राजकारणातून निवृत्ती घेऊन त्यांनी आपले लक्ष अनंतपूर येथील शेती व्यवसायात वळवले. जयप्रकाश नारायण यांच्या प्रभावामुळे आणीबाणीत ते पुन्हा सक्रिय राजकारणाकडे वळले. जनता पक्षातर्फे ते निवडून आले (१९७७). पुन्हा त्यांची लोकसभेचे सभापती म्हणून निवड झाली; परंतु काही दिवसांतच राष्ट्रपतिपदासाठी त्यांनी राजीनामा दिला. राष्ट्रपतिपदी ते बिनविरोध निवडून गेले. या पदावर बिनविरोध निवड होणारे ते पहिले राष्ट्रपती ठरले. 


राष्ट्रपतिपदाचा मर्यादा त्यांनी पक्षांतर्गत विरोध सहन करून पाळली. काँग्रेस पक्ष सत्तेवर असतानाही त्यांनी पक्षपाती भूमिका घेतली नाही. त्यांच्या या राजकीय बाण्यामुळे ते इतिहासात प्रसिद्ध झाले. कारण त्या वेळची राजकीय परिस्थिती पाहता मोठ्या पेचप्रसंगांतून त्यांनी राष्ट्रपतिपदाची शान राखली. निवृत्तीनंतर उर्वरित आयुष्य त्यांनी अनंतपूर येथे घालवले. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत एक सामान्य कार्यकर्ता म्हणून प्रवेश करून त्यांनी काँग्रेस पक्षाचा सचिव ते भारताचे राष्ट्रपती अशी अनेक उच्चपदे भूषवली. पक्षाचा अध्यक्ष, मुख्यमंत्री वा अन्य मंत्री या नात्याने त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. आंध्रप्रदेश राज्याच्या प्रगतीची पायाभरणी त्यांनी केली. 


कार्यतत्पर नेता, संयमी राजकारणी आणि सेवाभावी कार्यकर्ता या गुणविशेषांमुळे भारताच्या राजकारणात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. नीलम संजीव रेड्डी. राष्ट्रपतिपदी ते बिनविरोध निवडून गेले. या पदावर बिनविरोध निवड होणारे ते पहिले राष्ट्रपती ठरले. राष्ट्रपतिपदाचा मर्यादा त्यांनी पक्षांतर्गत विरोध सहन करून पाळली. काँग्रेस पक्ष सत्तेवर असतानाही त्यांनी पक्षपाती भूमिका घेतली नाही. त्यांच्या या राजकीय बाण्यामुळे ते इतिहासात प्रसिद्ध झाले. कारण त्या वेळची राजकीय परिस्थिती पाहता मोठ्या पेचप्रसंगांतून त्यांनी राष्ट्रपतिपदाची शान राखली. निवृत्तीनंतर उर्वरित आयुष्य त्यांनी अनंतपूर येथे घालवले.


चौधरी चरण सिंह यांना पंतप्रधानपदाची शपथ देताना तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी. आपल्या ५ वर्षांच्या कार्यकाळात ३ पंतप्रधानांना मोरारजी देसाई, चौधरी चरण सिंह आणि इंदिरा गांधी यांना शपथ दिली. वेगवान राजकीय घडमोडीं दरम्यान त्यांनी राष्ट्रपती म्हणून अशा परिस्थितीचा सामना केला ज्याबाबत घटने मध्ये स्पष्ट तरतूद नव्हती. पूर्वीपासून चालत आलेला एखादा पायंडाही नव्हता की ज्याचे अनुकरण करावे. पण परिस्थिती मात्र लगेच निर्णय घेण्याची होती. आणि अशा वेळी त्यांनी नि:पक्षपाती भूमिका घेऊन आदर्श कायम केला. म्हणून भारताच्या राजकारणात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी हे भावी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करतानाचा क्षण. कार्यतत्पर नेता, संयमी राजकारणी आणि सेवाभावी कार्यकर्ता या गुणविशेषांमुळे भारताच्या राजकारणात त्यांचे नाव आदराने घेतले जाते.

दिनविशेष :- 16 जून - वर्ल्ड रिफिल डे

दिनविशेष :- 16 जून - वर्ल्ड रिफिल डे संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here टिकाऊ पर्यायांचा अवलंब केल्याने कचरा कमी होतो, संसाधनांचे सं...