Friday, 19 May 2023

19 मे सामान्यज्ञान, जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती

19 मे सामान्यज्ञान, जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती


०१) आपल्या भारत देशाचे राष्ट्रगीत हे सर्वप्रथम कोठे गायले गेले ?

- भारतीय राष्ट्रीय कोंग्रेसच्या अधिवेशनात.(कोलकत्ता)


०२) 'ग्राम गणराज्य' ची संकल्पना कोणाची होती ?

- महात्मा गांधी.


०३) भारत देशातील चिनीमातीचे उत्पादन कोठे होते ?

- केरळ,सिंगभुम.(झारखंड)


०४) भारत देशाच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशाची संख्या किती ?

- सात.


०५) सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

- नर्मदा.


दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

19 मे दिनविशेष - उद्योजक जमशेदजी टाटा स्मृतिदिन

19 मे दिनविशेष - उद्योजक जमशेदजी टाटा स्मृतिदिन
जन्म - ३ मार्च १८३९ (नवसारी,गुजरात)
स्मृती - १९ मे १९०४


टाटा उद्योगसमूहाचे संस्थापक जमशेदजी नसरवानजी टाटा यांचा जन्म नवसारी, गुजरात येथे झाला. ‘टाटा’ हे नाव आज भारतीय उद्योगजगतात कल्पकता, उपक्रमशीलता, सचोटी आणि संपूर्ण व्यावसायिकता यांच्याशी समानधर्मी असे मानले जाते. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी टाटा उद्योगसमूहाची भक्कम पायाभरणी करणारे जमशेटजी टाटा यांनी अठराव्या शतकाच्या अखेरीस गुजरातच्या नवसारी नावाच्या एका छोट्याशा खेड्यात एक लहानसं रोपटं लावलं. आता या रोपट्याचा वटवृक्ष झालाय, त्याचं नाव टाटा उद्योग समूह. इतक्या वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द असलेला हा देशातला एकमेव उद्योग समूह असावा. जमशेदजींना उद्योगधंद्याची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. अर्थातच घरच्यांचा विरोध पत्करुन स्वत:चं नशीब आजमावायला ते मुंबईत आले तो काळ अत्यंत खडतर होता. कारण नुकताच ब्रिटीश सरकारने १८५७ चा उठाव चिरडला होता. ग्रॅज्युएट झालेल्या जमशेदजींना युरोप, इंग्लंड, अमेरिका येथे जाऊन आल्यावर समजलं की इंग्लंडचं वर्चस्व असलेल्या कापड उद्योगात खरंतर भारतानं मुसंडी मारली तर प्रचंड संधी उपलब्ध होतील. त्यादृष्टीने त्यांनी पावलं उचलायला सुरुवात केली. सुरुवातीला एकवीस हजार रुपये भांडवल गुंतवून जमशेदजींनी त्यांची पहिली कंपनी स्थापन केली. पुढे काही बंद पडलेल्या तेल गिरण्या, कापड गिरण्या विकत घेऊन, विकून त्यांनी उद्योग वाढवण्यास प्रारंभ केला. 


जमशेदजींना चार क्षेत्रांत स्वतःचा आणि अर्थातच भारताचा ठसा निर्माण करायचा होता - पोलाद कारखाने, अग्रेसर शिक्षणसंस्था, भारतातील सर्वोत्कृष्ट हॉटेल आणि जलविद्युत केंद्र. ज्यापैकी फक्त एक स्वप्न पूर्ण झालेले ते स्वत: पाहू शकले. ते स्वप्न म्हणजे 'द ताजमहल पॅलेस हॉटेल’. त्या काळातील बेचाळीस कोटी रुपये खर्च करुन ३ डिसेंबर १९०३ रोजी उद्घाटन झालेले 'ताजमहल' हे वीज वापरणारे देशातले पहिले हॉटेल होते. बाकी स्वप्न दोराबजी टाटा आणि रतन टाटा या त्यांच्या चिरजीवानी पूर्ण केली. 


आज टाटा गृपच्या १०० कंपन्या जगाच्या सहा खंडांतील ऐंशी देशांत कार्यरत आहेत. त्यातल्या काही मोठ्या कंपन्या म्हणजे टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा पॉवर, टाटा केमिकल्स, टाटा ग्लोबल बिव्हरेजेस, टाटा टेलिसर्व्हिसेस, टायटन इंडस्ट्रीज, टाटा कम्युनिकेशन्स आणि ताज हॉटेल्स. एके वर्षी टाटांच्या एका कंपनीत लहान मुलांसाठी एक स्पर्धा ठेवण्यात आली होती. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण वापरत असलेल्या वस्तूंची नावे लिहायची होती. त्यातली प्रत्येक वस्तू टाटाचे उत्पादन आहे का नाही ते शोधायचे होते. गंभीरपणे विचार केला तर खरोखरच मीठापासून गाडीपर्यंत प्रत्येक वस्तूच्या उत्पादनात टाटाचा हात आहे.

19 मे दिनविशेष - राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी जन्मदिन

19 मे दिनविशेष - राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी जन्मदिन
जन्म - १९ मे १९१३ (अनंतपूर,आंध्रप्रदेश)
स्मृती - १ जून १९९६

भारताचे सहावे राष्ट्रपती आणि आंध्रप्रदेशचे पहिले मुख्यमंत्री नीलम संजीव रेड्डी यांचा जन्म आंध्रप्रदेशातील इल्लूर (जि.अनंतपूर) येथे झाला. त्यांना स्वातंत्र्य चळवळीतील एक निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील नीलम चिनप्पा रेड्डी हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते. संजीव रेड्डींचे सुरुवातीचे शिक्षण अड्यार येथील थिऑसॉफिकल शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी अनंतपूरच्या कला महाविद्यालयातून उच्च शिक्षण घेतले. शिकत असतानाच ते युवक काँग्रेसकडे आकर्षिले गेले. १९३१ मध्ये त्यांनी शिक्षण अर्धवट सोडून महात्मा गांधींच्या असहकार चळवळीत उडी घेतली. यासाठी त्यांनी अनेकदा तुरुंगवासही भोगला. मधल्या काळात त्यांनी मिळेल ती नोकरी केली. तथापि, कुठेही ते कायम नोकरीत रमले नाहीत. नंतरच्या काळात ते आंध्र प्रांतिक काँग्रेसचे सचिव झाले. तत्पूर्वी त्यांचा नागा रत्नम्मा यांच्याबरोबर विवाह झाला. त्यांना २ मुले व ३ मुली अशी अपत्ये झाली. पैकी एक मुलगा बालपणीच अपघातात मृत्युमुखी पडला. महात्मा गांधीजींनी सुरू केलेल्या अनेक आंदोलनांत त्यांनी सर्वस्व झोकून भाग घेतला. सविनय कायदेभंगाची चळवळ आणि भारत छोडो आंदोलनात त्यांना प्रदीर्घ तुरुंगवास झाला. १९४६ मध्ये त्यांची तत्कालीन मद्रास प्रांताच्या विधानसभेवर निवड झाली. भारतीय संविधान समितीचेही ते सदस्य होते. 


स्वातंत्र्योत्तर काळात मद्रासच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपद भूषवले. त्यानंतर ते आंध्र प्रांतिक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीत त्यांची निवड झाली. याबरोबरच त्यांची लोकप्रियता वाढली. ऑक्टोबर १९५६ च्या राज्य पुनर्रचनेनंतर नव्याने तयार झालेल्या आंध्र प्रदेश राज्याचे पहिले मुख्यमंत्री ते बनले. यानंतर अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाली. त्यांच्या कार्यकाळात काँग्रेसची तीन अधिवेशने झाली. लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असताना पोलाद व खाणकाम खात्याचे मंत्री म्हणून त्यांना मंत्रिमंडळात घेण्यात आले. १९६७ पर्यंत राज्यसभेचे ते सदस्य राहिले. जानेवारी १९६६ ते मार्च १९६७ दरम्यान इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात पर्यटन मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. 


१९६७ मध्ये पुन्हा ते लोकसभेवर निवडून आले. त्यांची लोकसभेचे सभापती म्हणून निवड झाली. निःपक्ष सभापती म्हणून ते लोकप्रिय झाले. राष्ट्रपतिपदासाठी त्यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिला. तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसमध्ये ऐतिहासिक फूट पडून जुनी व नवी काँग्रेस असे दोन गट झाले होते. इंदिरा गांधींचा पाठिंबा असलेले व्ही.व्ही. गिरी यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाली. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीचा प्रयत्न केला. परंतु पदरी पराजय पडला. नंतर मात्र राजकारणातून निवृत्ती घेऊन त्यांनी आपले लक्ष अनंतपूर येथील शेती व्यवसायात वळवले. जयप्रकाश नारायण यांच्या प्रभावामुळे आणीबाणीत ते पुन्हा सक्रिय राजकारणाकडे वळले. जनता पक्षातर्फे ते निवडून आले (१९७७). पुन्हा त्यांची लोकसभेचे सभापती म्हणून निवड झाली; परंतु काही दिवसांतच राष्ट्रपतिपदासाठी त्यांनी राजीनामा दिला. राष्ट्रपतिपदी ते बिनविरोध निवडून गेले. या पदावर बिनविरोध निवड होणारे ते पहिले राष्ट्रपती ठरले. 


राष्ट्रपतिपदाचा मर्यादा त्यांनी पक्षांतर्गत विरोध सहन करून पाळली. काँग्रेस पक्ष सत्तेवर असतानाही त्यांनी पक्षपाती भूमिका घेतली नाही. त्यांच्या या राजकीय बाण्यामुळे ते इतिहासात प्रसिद्ध झाले. कारण त्या वेळची राजकीय परिस्थिती पाहता मोठ्या पेचप्रसंगांतून त्यांनी राष्ट्रपतिपदाची शान राखली. निवृत्तीनंतर उर्वरित आयुष्य त्यांनी अनंतपूर येथे घालवले. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत एक सामान्य कार्यकर्ता म्हणून प्रवेश करून त्यांनी काँग्रेस पक्षाचा सचिव ते भारताचे राष्ट्रपती अशी अनेक उच्चपदे भूषवली. पक्षाचा अध्यक्ष, मुख्यमंत्री वा अन्य मंत्री या नात्याने त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. आंध्रप्रदेश राज्याच्या प्रगतीची पायाभरणी त्यांनी केली. 


कार्यतत्पर नेता, संयमी राजकारणी आणि सेवाभावी कार्यकर्ता या गुणविशेषांमुळे भारताच्या राजकारणात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. नीलम संजीव रेड्डी. राष्ट्रपतिपदी ते बिनविरोध निवडून गेले. या पदावर बिनविरोध निवड होणारे ते पहिले राष्ट्रपती ठरले. राष्ट्रपतिपदाचा मर्यादा त्यांनी पक्षांतर्गत विरोध सहन करून पाळली. काँग्रेस पक्ष सत्तेवर असतानाही त्यांनी पक्षपाती भूमिका घेतली नाही. त्यांच्या या राजकीय बाण्यामुळे ते इतिहासात प्रसिद्ध झाले. कारण त्या वेळची राजकीय परिस्थिती पाहता मोठ्या पेचप्रसंगांतून त्यांनी राष्ट्रपतिपदाची शान राखली. निवृत्तीनंतर उर्वरित आयुष्य त्यांनी अनंतपूर येथे घालवले.


चौधरी चरण सिंह यांना पंतप्रधानपदाची शपथ देताना तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी. आपल्या ५ वर्षांच्या कार्यकाळात ३ पंतप्रधानांना मोरारजी देसाई, चौधरी चरण सिंह आणि इंदिरा गांधी यांना शपथ दिली. वेगवान राजकीय घडमोडीं दरम्यान त्यांनी राष्ट्रपती म्हणून अशा परिस्थितीचा सामना केला ज्याबाबत घटने मध्ये स्पष्ट तरतूद नव्हती. पूर्वीपासून चालत आलेला एखादा पायंडाही नव्हता की ज्याचे अनुकरण करावे. पण परिस्थिती मात्र लगेच निर्णय घेण्याची होती. आणि अशा वेळी त्यांनी नि:पक्षपाती भूमिका घेऊन आदर्श कायम केला. म्हणून भारताच्या राजकारणात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी हे भावी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करतानाचा क्षण. कार्यतत्पर नेता, संयमी राजकारणी आणि सेवाभावी कार्यकर्ता या गुणविशेषांमुळे भारताच्या राजकारणात त्यांचे नाव आदराने घेतले जाते.

18 मे सामान्य ज्ञान - जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

18 मे सामान्य ज्ञान - जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.


०१) कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहे ?

- यवतमाळ.


०२) जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो ?

- ११ जुलै.


०३) राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी झाली ?

- १९९३.


०४) महाराष्ट्र राज्यामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ?

- १९७२.


०५) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्याची (जंगल) टक्केवारी सर्वात जास्त आहे ?

- गडचिरोली.

दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

17 मे सामान्य ज्ञान जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

17 मे सामान्य ज्ञान जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.


०१) 'पर्यावरण दिवस' केव्हा साजरा केला जातो ?

 - ५ जून.


०२) महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते ?

- ताम्हण/जारूळ

०३) महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणत्या शहरास म्हणतात ?

- पुणे.


०४) 'नागझिरा' हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- गोंदिया.


०५) आशिया खंडातील सर्वात मोठी नैसर्गिक गुफा कोणती आहे ?

- कचारगड.(गोंदिया)

दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

17 मे दिनविशेष - गणितज्ञ राधानाथ सिकदर स्मृतिदिन

17 मे दिनविशेष - गणितज्ञ राधानाथ सिकदर स्मृतिदिन
जन्म - ५ ऑक्टोबर १८१३ (कोलकाता)
स्मृती - १७ मे १८७० (हुबळी,पश्चिम बंगाल)


राधानाथ सिकदर भारत के महान गणितज्ञ थे। उन्होने सबसे पहले सन १८५२ में एवरेस्ट की ऊँचाई की गणना की थी। उनकी स्कूली शिक्षा Phiringi कमल बोस स्कूल और हिंदू स्कूल, कोलकाता में हुई थी। वे विज्ञान की ओर आकर्षित हुए और बाद में इसे अपने विषय के रूप में लिया। बचपन से ही उनको गणित विषय में रूचि थी। जब १८३१ में भारत के सर्वेयर जनरल जॉर्ज एवेरेस्ट एक होशियार, जवान, गणितशास्त्री जो गोलाकार त्रिकोणमिती में होशियार हो, ऐसे नवयुवक को खोज रहे थे। तब हिन्दू कोलेज के प्रोफेसर टेटलर ने अपने विद्यार्थी राधानाथ सिकदर का नाम सजेस्ट किया। प्रोफेसर का उत्साह देखकर जॉर्ज एवेरेस्ट ने राधानाथ सिकदर को अपने साथ ले लिया। साल 1852 के आसपास का वक्त रहा होगा। एक रोज सुबह सवेरे सर्वे जनरल ऑफ इंडिया के डॉयरेक्टर ‘एंड्रयू स्कॉट वा’ अपने दफ्तर में थे। उनके साथ दूसरे कर्मचारी भी दफ्तर पहुंच कर काम में व्यस्त हो चले थे। उसी वक्त एक शख्स तूफान की तरफ ‘स्कॉट’ के कमरे में दाखिल होता है और खुशी से चींखते हुए कहता है, "सर, मैंने दुनिया की सबसे ऊंची पर्वत चोटी का पता लगा लिया है।" यह सुनकर स्कॉट हक्के-बक्के रह जाते हैं. वह शख्स आगे बताता है कि, सबसे ऊंची चोटी 29002 फीट है। कालांतर में ‘सर्वे ऑफ इंडिया‘ के पूर्व डॉयरेक्टर जॉर्ज एवरेस्ट के नाम पर उस पर्वत का नाम ‘माउंट एवरेस्ट’ रखा गया|

17 मे दिनविशेष - संशोधक डॉ. एडवर्ड जेन्नर जन्मदिन

17 मे दिनविशेष - संशोधक डॉ. एडवर्ड जेन्नर जन्मदिन
जन्म - १७ मे १७४९ (बर्कले,इंग्लंड)
स्मृती - २६ जानेवारी १८२३ (बर्कले,इंग्लंड)


काही शास्त्रज्ञ त्यांचे संशोधन व निष्कर्ष याबद्दल इतके ठाम असतात, की त्याचे प्रयोग स्वत:वरही करण्याची त्यांची तयारी असते. डॉ. जेन्नर यांनी त्या पुढची पायरी गाठत देवीसारख्या त्या काळी असाध्य मानल्या जाणार्‍या आजाराची लस आपल्या ११ महिन्यांच्या मुलाला टोचली. ज्ञानाच्या इतिहासामध्ये अनेक संशोधकांनी आपले संशोधन पूर्णत्वास नेण्यासाठी धाडसी प्रयोग केलेले आहेत. हे प्रयोग मुख्यत: उपकरणाच्या उपयोगाच्या बाबतीत होते. जेन्नर यांनी केलेले प्रयोग मात्र तरुण आणि लहान मुलांच्या संबंधातील होते. विशेष म्हणजे, त्यांना आपल्या संशोधनाविषयी आणि आपण केलेल्या अनुमानाविषयी एवढी खात्री होती, की त्यांनी त्यांच्या संशोधनाचा प्रयोग स्वत:च्या ११ महिन्यांच्या मुलावर केला. अठराव्या शतकात जगातील अनेक देशांमध्ये 'देवी' हा रोग अतिशय दुर्धर असा मानला जाई. देवीची लागण झाल्यामुळे शरीरावर अनेक विपरित परिणाम होत आणि काही लोकांना अंधत्व येत असे. त्याचप्रमाणे अनेक मुले या रोगाला बळी पडत.


एखाद्या समस्येने अनेक जण ग्रस्त असतात. मात्र, ती समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार्‍या व्यक्तींची संख्या अगदीच कमी असते. जेन्नर हे तरुणपणी जॉन हंटर या शल्यविशारदाबरोबर त्यांचे साहाय्यक म्हणून काम करीत होते. जॉन हंटर यांनी त्यांना एक कानमंत्र दिला होता. तो म्हणजे 'विचार करू नका, प्रयत्न करा.' जेन्नर यांनी छातीमध्ये होणार्‍या वेदनांचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला. अठराव्या शतकात युरोपमध्ये आपल्याकडील झोपडपट्टींशी साम्य दाखवणारी वसाहत होती. त्यामुळे तेथेही डास, पिसवा यांसारख्या कीटकांचा प्रादुर्भाव होता. त्यामुळे पिसवांपासून होणार्‍या रोगावरही त्यांनी संशोधन केले.


हे संशोधन करीत असताना 'देवी' या रोगामुळे होणार्‍या 'अपरिमित नुकसानी' कडे त्यांचे लक्ष गेले. त्या काळी देवी हा रोग असाध्य मानला जाई. त्याचा होणारा प्रादुर्भाव इतका प्रचंड होता, की जवळ जवळ ६० टक्के लोकांना त्याची लागण होत असे. या लागण झालेल्या लोकांपैकी २० टक्के लोक, तर मृत्युमुखी पडत. त्याचप्रमाणे चेहरा विद्रूप होणे, दृष्टीवर परिणाम होणे यांसारख्या गोष्टी घडून येत. देवी या रोगावर उपाय शोधण्याचा विचार करत असताना, त्यांच्या नजरेस एक गोष्ट पडली. गाईची धार काढणार्‍या स्त्रियांना या रोगाची लागण झाली, तरी त्यांच्यावर या रोगाचा होणारा परिणाम अतिशय कमी असे. या निरीक्षणावर विचार करताना त्यांच्या डोक्यामध्ये अशी कल्पना आली, की गाईंना होणारा देवीचा प्रादुर्भाव आणि त्यांच्या संपर्कातील स्त्रियांना होत नसलेला प्रादुर्भाव यामध्ये काहीतरी रहस्य दडलेले असावे. 


गाईच्या संपर्कात आल्यामुळे स्त्रियांना या रोगापासून बचाव करण्याची क्षमता प्राप्त होत असावी हे अनुमान तपासण्यासाठी त्यांनी एक धाडसी प्रयोग केला. गाईला झालेल्या देवीच्या व्रणातील स्राव त्यांनी एका १८ वर्षांच्या तरुणाच्या शरीरात टोचला. त्याचाच परिणाम असा झाला, की, त्या तरुणाला देवीची लागण झाली नाही. असाच प्रयोग त्यांनी इतर २३ व्यक्तींवर केला. त्यामध्येही त्यांना समाधानकारक यश मिळाले. असे होऊनही संशोधकांनी मात्र त्यांचा शोध मान्य केला नाही. शेवटच्या प्रयोगात त्यांनी या चाचणीमध्ये आपल्या ११ महिन्यांच्या मुलाचा समावेश केला. त्यांनी सातत्याने केलेल्या या प्रयोगामुळे संशोधकांना त्यांची दखल घ्यावी लागली. अखेर त्यांचे अनुमान मान्य होऊन देवीच्या रोगावर प्रतिबंधक लस तयार झाली. इंग्रजीमधील Vaccination हा शब्द Vacca म्हणजे गाय या शब्दापासून तयार झालेला आहे. देवीच्या व्रणातील स्राव शरीरामध्ये टोचल्यामुळे मानवाची प्रतिष्ठा कमी होते, असा आक्षेप घेण्यात आला. मात्र, या रोगामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडतात, याबाबत मात्र त्यांनी आस्था दाखविली नाही. जेन्नर यांची कल्पकता आणि त्यांची धाडसी वृत्ती यामुळे हे वरदान प्राप्त झाले.

17 मे दिनविशेष - जागतिक दूरसंचार दिन

17 मे दिनविशेष - जागतिक दूरसंचार दिन


टेलिफोनच्या आधी तारेने संदेश दिले जात होते. त्याचा विस्तार करण्यासाठी १७ मे १८६५ ला इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनची स्थापना झाली. याची सुरुवात १८६५ पासून करण्यात आली असली तरी, १९६९ पासून खऱ्या अर्थाने भारतातही हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. नोव्हेंबर २००६ मध्ये तुर्कीमध्ये झालेल्या एका विशेष कॉन्फरन्समध्ये जागतिक दूरसंचार दिवस, सूचना आणि सामाजिक प्रसारण दिवस एकाच दिवशी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. दूरसंचार क्रांती ही जगातील सर्वात महत्त्वाची आधुनिक तंत्रज्ञान आणि विकासाची क्रांती मानली जाते. यामुळे जगाची आणि पर्यायाने प्रत्येक मानवाची छबी बदलली गेली आहे, मोबाईलचा स्मार्टनेस आता व्यक्तित्वात प्रकट होतो आहे. आज दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धेत भारत सर्वात वेगाने आगेकूच करीत आहे. भारताने ४-जी, ५-जी क्रांतीत आपले मानांकन कायम ठेवले असले तरी जपान आणि चीन याही पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. १८८१ मध्ये भारत सरकारने ओरिएंटल टेलिफोन कंपनीकडे पहिल्या सरकारचा निर्णय रद्दबदल करीत इंग्लंडच्या ओरिएंटल टेलिफोन कंपनीला कलकत्ता, मुंबई आणि मद्रास येथे टेलिफोन सेवा सुरू करण्याची परवानगी दिली. त्यानुसार २८ जानेवारी १८८२ पासून भारतात मुंबईसह तीन ठिकाणी टेलिफोन एक्सेंज सुरू झाले. जागतिक दूरसंचार क्षेत्राने दिलेली ही सर्वात महत्त्वाची देण होती. मोबाइलच्या आधी सर्वत्र टेलिफोन अर्थात लॅण्डलाइन फोन होते. मोबाइल आल्यानंतरदेखील लॅण्डलाइन अस्तित्वात होतेच. मात्र मागील पाच ते सात वर्षांत मोबाइल क्षेत्रात ऐतिहासिक क्रांती झाली. या मोबाइल्सने टेलिफोनच काय तर इंटरनेट व लॅपटॉपचीदेखील जागा घेतली. यामुळे आता लॅण्डलाइन हळूहळू कमी होत चालले आहेत. 


भारतातील दूरसंचार क्षेत्रातील ग्राहकांच्या संख्येने फेब्रुवारीत १.१८ अब्जांचा आकडा पार केला आहे. पण एके काळी लोकप्रिय असलेल्या लँडलाइन फोनची मागणी मात्र आता प्रचंड प्रमाणात घटली आहे. स्वस्त दरात उपलब्ध होणारे हँडसेट, कंपन्यांमधील वाढती स्पर्धा आणि दूरसंचार सेवेचा स्वस्त दर या तीन प्रमुख कारणांमुळे लँडलाइनला फटका बसला आहे. भारतीय दूरसंचार क्षेत्राने संपूर्ण जगातल्या दूरसंचार क्षेत्रांच्या यादीत दूसरे स्थान प्राप्त केले आहे. तर या यादीतले पहिले स्थान चीन कडे आहे. जगभरात एका तासात दोन कोटींहून अधिक स्मार्ट फोन्सची विक्री होते, भारतात २०१३ मध्ये २० कोटी इंटरनेट ग्राहक होते, तर आज तीच संख्या ५० कोटींहून अधिक झाली आहे.

17 मे दिनविशेष - जागतिक उच्च रक्तदाब दिन

17 मे दिनविशेष - जागतिक उच्च रक्तदाब दिन


दरवर्षी १७ मे हा ‌दिवस 'जागतिक उच्च रक्तदाब दिन' म्हणून पाळला जातो. या आजाराविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिन पाळला जातो. या दिनाचे बोधवाक्य ‘Know your numbers’ (आपल्या बी.पी. चा आकडा जाणून घ्या) असे आहे. गेल्या काही वर्षांत लोकांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. सध्या देशातील शहरी भागांत २० ते ४० टक्के आणि ग्रामीण भागातील १२ ते १७ टक्के जनतेला उच्च रक्तदाब आहे. धावपळीची जीवनशैली, कामाचे वाढलेले तास, धूम्रपानाच्या जोडीला मद्यपान आणि आरोग्याला अपायकारक ठरणाऱ्या खाण्याच्या सवयींमुळे अनेक तरुण तरुणी उच्च रक्तदाबाच्या समस्येला बळी पडत आहेत. पण, सर्वात मोठी समस्या म्हणजे आपल्याला उच्च रक्तदाब आहे याची कल्पनाच अनेकांना नसते. रक्तदाबाच्या आजाराला खुले आमंत्रण आहे. मात्र चोरपावलांनी वस्तीला येणे, हा त्याचा गुण असल्याने अनेकांना त्याची खबरच लागत नाही. तो फारसा गाजावाजा न करता हळूच चोरपावलांनी येतो, त्याचे अस्तित्व काही काळ बरेच जणांना जाणवतही नाही; पण नंतर मात्र तो आक्रमक होतो आणि त्याची दखल आपल्याला घ्यावीच लागते. हळूच प्रवेशलेला हा पाहुणा अगदी आयुष्यभरासाठी आपले कायमचेच बस्तान बसवतो.


नेमका कोण आहे हा? ‘हा’ आहे, मुख्यत: चुकीच्या जीवनशैलीमुळे आपला जीवनसाथी होणारा ‘उच्च रक्तदाब’ वा हायपरटेन्शन किंवा शॉर्टकट संबोधन म्हणजे बी.पी. आज भारतात प्रौढांपैकी साधारणत: २३ टक्के लोकांना बीपीचा आजार आहे. याखेरीज अर्थात अनेकांना आपल्याला हा आजार आहे, याचीच कल्पना नसते, हे लक्षात घेतले, तर रुग्णांची टक्केवारी २३ टक्क्यांहून जास्त असण्याचीच शक्यता आहे. 


पूर्वीच्या काळी उतारवयात लोकांना बी.पी. चा त्रास मागे लागायचा. अलीकडे मात्र तरुण वयातच तो गाठतो. ‘आमच्या ओपीडीचा चेहरा तरुण होत चाललाय’ असे गमतीने हृदयरोगतज्ज्ञ म्हणतात. ज्येष्ठ नागरिका बरोबरच तरुण मॅनेजर्स, सीईओचा भरणा आज रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये आहे. पूर्वी साठीला लागणारी औषधे त्यामुळेच आज तिशीतच गरजेची बनतात. इतकेच काय, पण शालेय मुलांमध्येही रक्तदाब वाढलेला दिसतो, असे काही पाहण्यांमध्ये दिसून आले. पुन्हा श्रीमंत गरीब, शहरी ग्रामीण अशा सर्वच वर्गात हा आजार आता आढळतो. जगभरच अर्थात हा ट्रेंड आहे. आणि ज्या झपाट्याने या रुग्णांची संख्या वाढते आहे, ते बघून हा साथीचा रोग नसतानाही त्याला ‘वैश्विक आधुनिक साथ’ असे संबोधले जाते. 


हृदयाच्या आकुंचन (Systole) व प्रसरणाने (Diastole) रक्तवाहिन्यांमध्ये रक्त वाहते. रक्ताचा वाहिन्यांच्या भिंतींवर जो दाब पडतो, तो म्हणजे रक्तदाब. शरीरातील अनेक रसायने व यंत्रणा हा रक्तदाब नियंत्रित करत असतात. साधारणत: १२०/८० (सिस्टोलिक/डायस्टोलिक) हे बी.पी. नॉर्मल समजले जाते. १४०/९० ही नॉर्मल रक्तदाबाची सीमारेषा. या दरम्यानचा रक्तदाब (१२०-१४० / ८०-९०) ही उच्च रक्तदाब पूर्वस्थिती व १४०/९० च्या वर असला तर उच्च रक्तदाब समजला जातो. अर्थात, असे रिडिंग सातत्याने मिळाले तरच त्याला बी.पी. चा रुग्ण मानले जाते. कधी कधी शारीरिक, मानसिक धावपळीने तात्पुरता रक्तदाब वाढतो व नंतर लगेच नॉर्मललाही येतो. म्हणून डॉक्टर वेगवेगळ्या दिवशी रक्तदाबाची तपासणी करतात. सातत्याने तो वाढलेला दिसला तरच त्याला उच्च रक्तदाबाचा रुग्ण, असे शिक्कामोर्तब केले जाते.


रक्तदाबाचा त्रास मागे लागण्यामागे काय कारणे मुख्यत: आहेत? नेमक्या एका कारणावर बोट ठेवता येत नाही. अनेक वेगवेगळे घटक यास कारणीभूत असतात. वाढते वय, अनुवंशिकता या कारणांखेरीज यास जीवनशैली मुख्यत: कारणीभूत असते. लठ्ठपणा, चुकीचा आहार, यातही सोडियमयुक्त आहार अधिक म्हणजे आहारात मिठाचे प्रमाण अधिक व पोटॅशियमयुक्त आहार कमी म्हणजे फळे व भाज्या कमी, धूम्रपान, दारूचे व्यसन, सुस्त रुटीन, व्यायामाचा अभाव, मानसिक ताणतणाव हे घटक रक्तदाब वाढवण्यास कारण ठरू शकतात.


रक्तदाब वाढू लागला की लक्षणे दिसतीलच असे नाही. म्हणूनच याला चोरपावलाने येणारा आजार ‘सायलेंट किलर’ म्हटले जाते. हे अत्यंत धोक्याचे आहे. कारण लक्षण दिसली नाहीत तर सहसा कोणी डॉक्टरकडे धाव घेत नाही, अशीच आपली कृती असते. त्यामुळे वाढलेला रक्तदाब आपल्या अनेक अवयवांवर नकळत दुष्परिणाम करत जातो. काही जणांमध्ये लक्षण दिसतात. उदा. सूज, थकवा, डोकेदुखी, अस्पष्ट दिसणे, धाप लागणे, उलट्या, चक्कर, बधिरता. पण इतरही अनेक आजारांत ही लक्षणे दिसतात. त्यामुळे हा रक्तदाबाचाच त्रास आहे, असे काही लगेच सुशिक्षित माहीतगारांच्याही लक्षात येत नाही. या वरील चर्चेवरून नियमित वैद्यकीय तपासणी तरुणपणापासूनच (२५-३० वयापासूनच) केल्यास रक्तदाबावर नजर ठेवली जाईल.


समजा रक्तदाब नियंत्रणात नाही राहिला, बराच काळ वाढलेल्या स्थितीत राहिला तर काय गुंतागुंत होते? मेंदूत वा इतर अवयवात रक्तस्राव, हार्ट अटॅक, मूत्रपिंडे निकामी होणे अशा अनेक इमर्जन्सी येतात. पण जर वेळीच रोगनिदान झाले व औषधोपचार नियमित चालू ठेवले, जीवनशैली सुधारली, तर नक्कीच हा आजार आपल्या कह्यात राहतो. उच्च रक्तदाबासाठी विविध प्रकारची, विविध प्रकारे शरीरात काम करणारी औषधे उपलब्ध आहेत. उदा. लोसार-एच, अटेन, टेल्मा, अमलो, नेनिकार्ड इत्यादी. रुग्णाचे वय, रक्तदाबाची तीव्रता, इतर आजार (उदा. मधुमेहही आहे का), किडनी-यकृताची कार्यक्षमता अशा अनेक बाबींचा विचार करून उपचार मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोणत्या रुग्णाला कोणते औषध द्यायचे, हे डॉक्टर ठरवतात. या गोळ्या रोज नियमितपणे ठरलेल्या वेळी घेणे आवश्यक असते. पण अगदी सुशिक्षिता मध्येही उपचारांत धर-सोड करणारे ४०-५०% रुग्ण आढळतात. 


कंटाळा, विसरणे, ‘सवय’ लागते हा गैरसमज, दुष्परिणामाची विनाकारण भीती, तपासणीत नॉर्मल दिसले तर ‘आता काय बी.पी. नॉर्मल आहे, कशाला घ्यायची गोळी’ असा घातक विचार, मध्येच इतर पॅथीकडे वळणे अशामुळे गोळी सोडली जाते. यथावकाश रक्तदाब नियंत्रणात न राहिल्याने वर उल्लेख केल्याप्रमाणे स्ट्रोक, हार्ट अटॅक अशा इमर्जन्सी येतात व थेट ‘आयसीयू’त धाव घ्यावी लागते. हे सर्व नियमित औषधे घेतल्याने टळू शकते, पण तरी अनेक रुग्णांची ‘बंडखोरी’ ही आपत्ती ओढवून घेत असते. रक्तदाबाची औषधे बहुतांशी रुग्णांना आयुष्यभर घ्यावीच लागतात. कोणतेही औषध म्हटले की साइड इफेक्ट्स असू शकतात. कोरडा खोकला, घोट्यावर सूज, थकवा, पोटॅशिअमचे रक्तातील प्रमाण कमी जास्त होणे वगैरे दुष्परिणाम काही रुग्णांमध्ये दिसू शकतात. झोपण्याच्या स्थितीतून झटकन उभे राहायला गेले, तर तोल जाऊ शकतो. हे विशेषत: वृद्ध रुग्णांमध्ये दिसते. गोळ्या चालू करताना अपेक्षित काही दुष्परिणाम आहेत का, याविषयी डॉक्टरांना जरूर विचारावे व नंतर काही त्रास वाटल्यास स्वमनाने गोळी बंद न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


रुग्णांना रक्तदाबाखेरीज इतर काही आजार असतील, तर त्यांना अनेक औषधे घ्यावी लागतात. यापैकी काही औषधांचा रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो. उदा. काही वेदनाशामकांच्या सतत सेवनाने, सर्दी खोकल्याच्या काही औषधांनी, स्टिरॉईड्समुळे, गर्भनिरोधक गोळ्या यामुळे रक्तदाब वाढू शकतो व त्यामुळे रक्तदाबाच्या गोळ्यांचा परिणामही कमी होऊ शकतो. मधुमेह व अस्थमाच्या औषधांचेही रक्तदाबाच्या औषधांशी पटत नाही. म्हणून आपण घेत असलेल्या सर्व औषधांचे एकमेकांत पटावे, त्यांच्यात आंतरक्रिया (interactions) होऊन काही दुष्परिणाम होऊ नयेत, यासाठी आपल्या प्रत्येक डॉक्टरांना इतर डॉक्टरांनी दिलेली सर्व औषधे सांगणे वा दाखवणे गरजेचे आहे. त्यानुसार डॉक्टर्स औषधयोजना करतील. अ‍ॅसिडिटीसाठी अनेक रुग्ण स्वमनाने वारंवार अँटासिड्स वापरतात. अनेक अँटासिड्स मध्ये सोडियम असते. त्यामुळे ती कधीतरी घेणे ठीक; पण वारंवार योग्य नाही. अ‍ॅसिडीटी, सर्दी खोकला यासाठी मी स्वमनाने कोणती औषधे घेऊ शकतो, हे डॉक्टरांना विचारून ठेवावे.

Thursday, 18 May 2023

18 मे - दिनविशेष - जागतिक संग्रहालय दिन

18 मे - दिनविशेष - जागतिक संग्रहालय दिन


संग्रहालयांची संकल्पना, संग्रहित केलेल्या ठेव्याची महिती, नागरिकांना इतिहासातील घडामोडीची व ऐतिहासिक संशोधकांना अभ्यासपर माहिती मिळावी या उद्देशाने इंटरनॅशनल काऊन्सिल ऑफ म्युझियम यांनी १८ मे १९७७ हा दिन जागतिक संग्रहालय दिन म्हणून साजरा करण्यास आरंभ केला. संग्रह म्हटलं की छंद, सामान्य व्यक्ती एखाद्या गोष्टीकडे सीमित दृष्टीकोनातून पाहतो पण त्याच गोष्टीकडे छंदवेडी व्यक्ती कल्पकतेने पाहते. छंद आयुष्यात उर्जा निर्माण करतो, असे मानणाऱ्या आणि प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात कोणतातरी छंद बाळगायला हवा असे म्हणणारे आमचे बंधू दीपक वेलणकर यांचा विंटेज कारचा छंद. ‘विंटेज कार’ बाळगणे हे येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. याचा अर्थ ही हौस केवळ श्रीमंत माणसांचीच आहे, असेही नाही. मुख्य म्हणजे त्यासाठी गाडीवर प्रेम असावे लागते. ही गाडी सुद्धा इतर गाडय़ांसारखी धातूपासूनच तयार झालेली असते, असे असले तरी हिचा सांभाळ करताना धसमुसळेपणा करून चालत नाही. तिला तळहातावरील फोडाप्रमाणे जपावे लागते. ती आहे तशीच रहावी यासाठी हरप्रकारे प्रयत्न करावे लागतात. 


एकीकडे अद्ययावत तंत्रज्ञान असलेल्या कितीही गाड्या बाळगल्या तरी ही गाडी अनमोल असते. इतर गाडय़ांच्या बाबतीत आपण कितीही ‘रफ अँड टफ’ वागत असलो तरी व्हिन्टेज गाडय़ांच्या बाबतीत मात्र ‘हँडल वुइथ केअर’ या धोरणाचा अवलंब करावा लागतो. पुण्यातील दीपक वेलणकर असाच विंटेज व क्लासिक कार व दुचाकीचा छंद बाळगून आहेत. गेली अठरा हून अधिक वर्षे ते विंटेज कार छंद बाळगुन आहेत. दीपक वेलणकर यांच्या कलेक्शन मध्ये १९४२ सालपासून ते १९६२ साला पर्यतच्या विंटेज व क्लासिक गाड्या आहेत. तसेच १९५८ वेस्पा डग्लस ते १९८४ ची एन्फिल्ड मोपा अशा दुचाकी त्यांच्याकडे आहेत. 


त्यांच्या कलेक्शन मध्ये १९३९ सालातील फियाट बलीला (७ सिटर), १९४७ सालची हिंदुस्थान-10, १९४९ सालीची स्कोडा, १९५४ सालची फियाट Milli Cento, १९५८ ची लॅडमास्टर, १९६१ सालची मर्सडीझ 190-D, १९६२ सालची स्टॅन्डर्ड (ओपन) अशा मिळून जवळ जवळ १० ते १२ व्हिन्टेज कार व तेवढ्याच दुचाकी आहेत. दीपक वेलणकर यांच्या मर्सडीझ 190-D ही अक्षय कुमारच्या 'रुस्तम' या चित्रपटात, व फियाट ‘मी वसंतराव’ या चित्रपटात वापरल्या आहेत. त्यांच्या विंटेज कार्स व दुचाकी मेंटेन केल्याने अगदी कालच खरेदी केल्या सारख्या दिसतात. पुणे, मुंबई, गोवा येथे होणाऱ्या 'व्हिंटेज कार' रॅली मध्ये ते नेहमी भाग घेतात. त्यांच्या विंटेज कारचे कायम स्वरूपी एक संग्रहालय करायचा विचार आहे. जागतीक संग्रहालय दिवसाच्या निमित्ताने दीपक वेलणकर यांच्या विंटेज कारच्या छंदाला सलाम.

18 मे दिनविशेष- कोकण कृषी विद्यापीठ स्थापना दिन स्थापना - १८ मे १९७२

18 मे दिनविशेष- कोकण कृषी विद्यापीठ स्थापना दिन

स्थापना - १८ मे १९७२


कोकण कृषी विद्यापीठ म्हणजेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचा आज वर्धापन दिन. कोकणातील शेती, पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय यांचा विकास करुन येथील ग्रामीण लोकांची आर्थिक उन्नती करण्यास मदत व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने १८ मे १९७२ रोजी दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना केली. त्यावेळी या विद्यापीठाकडे दापोलीचे कृषी महाविद्यालय, मुंबईचे पशुवैद्यक महाविद्यालय आणि कोकणातील १६ संशोधन केंद्रे होती. दोन वर्षांनी कोकणातील तीन शेती शाळाही या विद्यापीठाच्या अधिपत्याखाली देण्यात आल्या. या विद्यापीठाचे मुख्य केन्द्र दापोली येथे असून, महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि बृहन्मुंबई हे जिल्हे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात. गेल्या ४८ वर्षात विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण कार्याचा लक्षणीय विस्तार झाला. कोकण कृषी विद्यापीठ हे देशातील सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार प्राप्त केलेले अग्रगण्य कृषी विद्यापीठ आहे. १२ फेब्रुवारी २००१ रोजी कोकणचे सुपुत्र आणि द्रष्टे लोकनेते कै. डॉ. बाळासाहेब सावंत यांचे नाव या विद्यापीठाला दिले गेले.


या विद्यापीठाने अगदी स्थापने पासून कोकणातील शेतकऱ्यांच्या कृषी विषयक गरजांना प्राधान्य देऊन संशोधन केले आणि हे उपयुक्त संशोधन कोकणातील सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विविध विस्तार शिक्षण उपक्रम राबविले. त्याचाच परिणाम म्हणून कोकणातील शेतीत क्रांतीकारी परिवर्तन होत आहे. दापोली (रत्नागिरी) येथे कृषी, कृषी अभियांत्रिकी, वनशास्त्र आणि उद्यानविद्या तसेच रोहा (रायगड) येथे काढणी पश्चात व्यवस्थापन पदव्युत्तर अभ्यासक्रम व मुळदे (सिंधुदूर्ग) येथे उद्यान महाविद्यालय अशी सहा घटक महाविद्यालये असून रत्नागिरी येथे मत्स्य महाविद्यालय आहे. याशिवाय विद्यापीठाची मान्यताप्राप्त सहा कृषी व एक उद्यानविद्या महाविद्यालय, दोन कृषी पणन व व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालये, चार अन्नतंत्र महाविद्यालये, चार जैवतंत्रज्ञान महाविद्यालय आणि एक कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय कार्यरत आहे. अशाप्रकारे आठ विषयांतील पदवी शिक्षणाची सोय विद्यापीठाने उपलब्ध केली आहे. 


याशिवाय, कृषी विद्याशाखे मध्ये अकरा विषयांत, मत्स्य विद्याशाखेत सहा विषयांत आणि कृषी अभियांत्रिकी विद्याशाखेत पाच विषयात पदव्युत्तर शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे कृषी विद्याशाखेत नऊ आणि मत्स्य विद्याशाखेत सहा विषयात पीएचडी शिक्षण दिले जाते. कृषी अभियांत्रिकीच्या तीन विषयात पीएचडी शिक्षणाची सुविधा सुरु आहे. विद्यापीठाच्या निम्नस्तर कृषी विद्याशाखेंतर्गत रायगड जिल्ह्यातील रोहा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे विद्यापीठाची घटक कृषी तंत्र विद्यालये आहेत. शिवाय पालघर जिल्ह्यातील कोसबाडहिल येथील दोन कृषी तंत्र विद्यालये तसेच ३४ खाजगी मान्यताप्राप्त कृषी तंत्र विद्यालये कार्यरत आहेत. 


घटक तंत्र विद्यालया मध्ये दोन वर्ष कालावधीचा कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम तर विना अनुदानित तंत्र विद्यालयामध्ये ३ वर्ष कालावधीचा कृषी तंत्र निकेतन अभ्यासक्रम शिकविला जातो. तसेच शिरगांव (रत्नागिरी) येथे मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम आहे. याशिवाय बागकाम तंत्रज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रमही शिकविला जातो. दापोली येथे विद्यापीठाचे मध्यवर्ती ग्रंथालय असून तेथे ४९ हजारहून अधिक ग्रंथ व क्रमिक पुस्तके आहेत. त्याशिवाय, कोकणा विषयी आणि स्पर्धा परीक्षा विषयी स्वतंत्र दालने आहेत. ग्रंथालयात शंभराहून अधिक नियतकालिके व वर्तमानपत्रे येतात. याशिवाय, प्रत्येक महाविद्यालयात स्वतंत्र ग्रंथालय आहे. 


विद्यापीठातील सर्वच महाविद्यालये, ग्रंथालये, वसतीगृहे इत्यादी ठिकाणी संगणक व इंटरनेट सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण कार्यालयातर्फे राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. विविध शिष्यवृत्त्या, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्था मधील प्रवेश प्रक्रिया तसेच रोजगारा संबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थी विद्यार्थीनींसाठी पुरेशी निवास व्यवस्था उपलब्ध आहे. संशोधन वाकवली येथील मध्यवर्ती संशोधन केंद्र आणि कोकणात सर्वदूर पसरलेल्या संशोधन केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठाचे संशोधन कार्य चालते.


कृषी विद्याशाखेतील संशोधन प्रामुख्याने तृणधान्ये, कडधान्ये, गळीतधान्ये, फळपिके, कृषी वनिकी, चारापिके, पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय, वनस्पती जैवतंत्रज्ञान, काढणी नंतरचे तंत्रज्ञान, रेशीम शेती, उच्चतंत्र शेती, खार जमीन, कृषी अभियांत्रिकी आणि सामाजिक आर्थिक विषयांवर केंद्रात असते. मत्स्य विद्याशाखेत सागरी, निमखाऱ्या आणि गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन या विषयांवर संशोधन केले जाते व त्यामध्ये मत्स्य उत्पादन व प्रक्रिया, मत्स्य संसाधन व्यवस्थापन आणि मत्स्य जीवशास्त्र इत्यादी विषयांवर भर दिला जातो. कृषी अभियांत्रिकी विद्याशाखे मध्ये मृद व जलसंधारण, सिंचन व निचरा, कृषी संरचना, कृषी प्रक्रिया, कृषी शक्ती आणि यंत्रे, विद्युत व इतर ऊर्जा साधने इत्यादींशी संबंधित अभियांत्रिकी बाबींवर संशोधन केले जाते. 


विविध संस्थांनी पुरस्कृत केलेले सुमारे १३० संशोधन प्रकल्प सध्या विद्यापीठात कार्यान्वित आहेत. विद्यापीठाने आतापर्यंत कोकणातील महत्त्वाच्या पिकांच्या ७५ पेक्षा अधिक उत्पादन देणाऱ्या जाती विकसित केल्या आहेत. हापूस आंब्यातील अनियमित फलधारणा आणि फळातील साका हे दोष घालविण्यासाठी रत्ना आणि सिंधु या दोन संकरित जाती विद्यापीठाने विकसित केल्या. विद्यापीठाने सेंट्रल इलेक्ट्रानिक इंजीनिअरींग रिसर्च इन्स्टिट्यूट, चेन्नई आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टीकल्चर रिसर्च, बंगलोर येथील शास्त्रज्ञांच्या सहकार्याने हापूस आंबा फळे न कापता त्याचे यंत्राद्वारे स्कॅनिंग करुन आंबा फळातील साका ओळखण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. उच्चतंत्र पुष्पशेतीचा विद्यापीठात सुरु असलेला प्रकल्प आदर्शवत आहे. कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, अळंबी संवर्धन, रेशीमशेती, मधुमक्षिका पालन, गांडूळखत निर्मिती इत्यादी पूरक व्यवसायांचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करण्याचे तंत्रज्ञान विद्यापीठाने प्रमाणित केले आहे. 


फळमाशीच्या नियंत्रणासाठी विद्यापीठाने शिफारस केलेल्या रक्षक सापळ्यास खूप मागणी आहे. मत्स्य व्यावसायिकांच्या समस्या दूर करुन मत्स्योत्पादन वाढीस पोषक असे तंत्रज्ञान विद्यापीठाच्या मत्स्य विद्याशाखेने विकसित केले आहे. विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा संबंधिता पर्यंत प्रसार करण्यासाठी विद्यापीठ अनेक नाविन्यपूर्ण विस्तार शिक्षण उपक्रम राबवित आहे. विद्यापीठाने शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण क्षेत्रात केलेल्या मौलिक योगदानाची दखल घेत, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने देशातील सर्वोत्कृष्ट कृषी विद्यापीठ म्हणून १९९७ साली या विद्यापीठाला गौरविले आहे.

18 मे गणितज्ज्ञ उमर खय्याम जन्मदिन जन्म - १८ मे १०४८ (इराण) स्मृती - ४ डिसेंबर ११३१ (इराण)

18 मे गणितज्ज्ञ उमर खय्याम जन्मदिन
जन्म - १८ मे १०४८ (इराण)
स्मृती - ४ डिसेंबर ११३१ (इराण)


'जन्म आणि मृत्यू' ही माणसाच्या जीवनातील न उलगडणारी कोडी आहेत, असं सांगणारे प्रसिद्ध गणितज्ज्ञ म्हणजे उमर खय्याम. त्यांचा परिचय बहुतेकांना झाडाखाली अरबी वेशातला दाढीवाला कवी, शेजारी सुरा आणि सुंदरी या चित्राद्वारे झालेला असतो. तंबू बांधणीचे काम करणाऱ्या पर्शियातील एका कुटुंबात उमर खय्याम यांचा जन्म  झाला होता. अरबेक सूत्रांनुसार ओमर यांचे पूर्ण नवं हे अबुल फाथ ओमर इब्न इब्राहिम अल खय्याम असे असले तरी आपल्या गणित खगोलशास्त्र व कविता या तिन्ही क्षेत्रा मध्ये ते उमर खय्याम म्हणूनच ओळखले जातात. उमर खय्याम यांनी आपल्या जीवनातील सर्वाधिक काळ हा गणिती शोधांसाठी समर्पित केलं होतं. गणिततज्ञ म्हणून काम करत असताना, क्युबिक समीकरणांचे वर्गीकरण आणि उत्तरे शोधण्यासाठी तयार केलेल्या पद्धतीने त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली होती. भौमितिक पद्धतीने कोनिक्सचा व छेदबिंदूंचा अभ्यास करून तयार केलेली ही सोप्पी पद्धत आकलनात येऊ शकेल असा पहिला शोध मानला जातो. यासोबतच समांतर विश्वाच्या अस्तित्वा बद्दलचे त्यांचे सिद्धांत देखील वैज्ञानिकांकडून अभ्यासले जातात.


एकीकडे गणिता सारखा विषय हाताळणारे उमर खय्याम हे कवी म्हणून देखील परिचित होते. आपल्या जीवन काळात त्यांनी जवळपास हजारहून देखील जास्त रुबायत व श्लोक तयार केले आहेत. यापैकी 'रुबायत ऑफ ओमर खय्याम' हा एडवर्ड फित्झगेराल्ड याने अनुवाद केलेला कवितांचा संग्रह पश्चिमेकडील देशा मध्ये यांच्या मृत्यू नंतर प्रसिद्ध झाला. तल्लख बुद्धीचे ओमर हे तद्कालीन खोरोसन प्रांतातील मलिक शाह पहिल्या याच्या साम्राज्यात सल्लागार व ज्योतिषी म्हणून काम करत होते. याशिवाय ओमर खय्यम यांनी बीजगणितात देखील मोलाची कामगिरी केल्याचे दिसून येते. आपल्या सांगीतिक व गणित विषयातील शोधांवर आधारित 'प्रॉब्लेम्स ऑफ अरीथमेटिक' हे पुस्तक ओमर यांनी लिहिले आहे. 


उमर खय्याम हे अरब राजवटीतील सर्वोत्कृष्ट गणितज्ज्ञ आणि भविष्यवेत्ता होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत प्रसिद्ध सौरवर्षाचे कॅलेंडर आणि जलाली कॅलेंडरचा शोध लावला. ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करून त्यांनी ज्योतिषशास्त्रातही अनेक शोध लावले होते.  त्यांच्या रुबायांचा भावानुभव ‘श्रीगुरुकरुणामृत’ या नावे प्रसिद्ध झाल्याचे वाचून वाचकांची उत्सुकता निश्चितच चाळवेल. व्यंकटेश माधव दातार यांनी पुस्तकाची जन्मकथा अशी सांगितली आहे की, ‘गुरुमाऊली ब्रह्मानंद मायींनी १९१६ डिसेंबर मध्ये एका उत्सवात उमर खय्यामच्या रुबायांचा मराठीत अनुवाद करून त्यातील तत्त्वज्ञान हे हिंदू तत्त्वज्ञानाशी समान आहे हे स्पष्ट करण्याची आज्ञा दिली. त्यानुसार दातार यांनी हा ग्रंथ रचला. म्हणून त्याचे नाव ‘गुरुकरुणामृत.’ तसेच मराठीत उमर खय्यामच्या ५२४ रुबायांचा अनुवाद माधव ज्युलिअन यांनी केला आहे. ज्युलिअन यांनी रुबायांचे जे वर्गीकरण केले आहे त्यापेक्षा वेगळे वर्गीकरण दातार करतात व त्यातील अर्थाची भिन्न प्रकृती व्यवस्थित मांडतात. उमर खय्याम यांचे ४ डिसेंबर ११३१ रोजी निधन झाले. त्यांना खोरासान येथील खय्याम गार्डन मध्ये पर्शियन विधी प्रमाणे पुरण्यात आले. 

18 मे दिनविशेष - वैज्ञानिक बर्ट्रांड रसेल जन्मदिन जन्म - १८ मे १८७२ (UK) स्मृति - २ फेब्रुवारी १९७० (UK)

18 मे दिनविशेष - वैज्ञानिक बर्ट्रांड रसेल जन्मदिन
जन्म - १८ मे १८७२ (UK)
स्मृति - २ फेब्रुवारी १९७० (UK)


"Thought is subversive and revolutionary, destructive and terrible, Thought is merciless to privilege, established institutions, and comfortable habit. Thought is great and swift and free." ~ बर्ट्रांड रसेल


बर्ट्रांड रसेल हे एकोणिसाव्या-विसाव्या शतकातील एक प्रमुख तत्त्वज्ञ, गणिती, इतिहासकार, सामाजिक-राजकीय टीकाकार. या माणसानं पुस्तकं लिहिली, लेख लिहिले, भाषणं दिली, वाद घातले. जन्मभर विचारांचा पाठपुरावा केला. सत्य, विवेक, उदारमतवाद, युद्ध, हट्टाग्रह यांबद्दल रसेलनं गेल्या शतकात लिहून ठेवलेलं आजही तितकंच लागू आहे. वैचारिक स्पष्टता आणि निष्पक्ष चिकित्सा हे रसेल यांच्या साहित्याचे वैशिष्ट्य. व्यक्ती कितीही महनीय असली, तरी रसेल तिच्या मोठेपणाचे दडपण घेत नाहीत. तिच्या विचारांना तर्कसंगतीची कसोटी लावून त्यातील काय ग्राह्य आणि काय त्याज्य याची निर्भिड चर्चा ते करतातच. 'अनपॉप्युलर एसेज्' मध्ये रसेल प्लेटो, अ‍ॅरिस्टॉट्ल पासून ते लेबनीझ, कांट, हेगेल, मार्क्स या सर्वांच्या विचारांमधील किंवा वर्तणुकीतील विसंगतीची चर्चा करतात. त्यामागील हेतू अर्थातच त्या व्यक्तीची अप्रतिष्ठा करणे हा नसून, विवेकवादाचा प्रसार हाच असतो. आपल्या समजुती, आपले आचार-विचार सर्वश्रेष्ठ, आपली जात किंवा धर्म सर्वांत योग्य असे मानून ते इतरांवर लादण्याच्या प्रवृत्ती विरुद्ध रसेल जन्मभर लढले. त्यासाठी त्यांनी लेखणी हेच अस्त्र वापरले. 'अनपॉप्युलर एसेज्' हे असेच एक अस्त्र होय. त्यातील लेखांचे विषय वरकरणी निरनिराळे वाटले, तरी त्यांमधील अंतःप्रवाह एकच आहे. तो म्हणजे सत्ताधार्‍यांच्या किंवा बलवानांच्या हट्टाग्रहांपायी समस्त मानवजातीस सहन करावा लागलेला त्रास.


हट्टाग्रहांना दूर कसे ठेवायचे याचेही अनेक साधे-सोपे मार्ग रसेल सुचवतात. त्यातील सर्वांत व्यवहार्य मार्ग म्हणजे विज्ञानाची कार्यपद्धती शिरोधार्य मानणे. विज्ञान कधीही कुठल्याही सिद्धांतास त्रिकालाबाधित सत्य समजून कवटाळून बसत नाही. त्या त्या परिस्थितीतील सर्वांत संभवनीय स्पष्टीकरण याच दृष्टिकोनातून त्यांकडे बघते. नव्या प्रयोगांमधून नवी निरीक्षणे समोर आली, तर आधीचे निष्कर्ष बदलण्याची तयारी ठेवते. विज्ञान वैज्ञानिकांची किंवा प्रचलित समजुतींची सत्ता मानत नाही. म्हणूनच विज्ञान नव्या विचारांचा गळा घोटत नाही. याउलट धर्मशास्त्रांत सत्ता व्यक्तींची किंवा व्यक्तींनी बनवलेल्या नियमांची असते. कालांतराने अशा व्यक्तींचे देव तरी होतात किंवा सत्ताधारी तरी. मग त्यांनी केलेले नियम मोडणे हे पाप तरी समजले जाते, किंवा गुन्हा तरी. 


विज्ञान कोणालाही देव करत नाही, तरी ते नम्र व लवचीक असते. याउलट धर्मशास्त्रे उद्दाम व ताठर होतात. सत्य हा अनेकदा सत्याचा आभास असतो. हा आभास कधी बुद्ध्या तयार केलेला असतो, तर कधी माणसाच्या आकलनशक्तीला पडलेल्या मर्यादांमुळे निर्माण होतो. या मर्यादांचे भान असणे, म्हणजे विवेक. असे भान माणसाला स्वमत-आग्रहांपासून परावृत्त करते; दुसर्‍याला आपल्यापेक्षा निराळे मत असण्याचा अधिकार आहे, हे मान्य करते. हाच झाला उदारमतवाद. आज जगाला या दोन्ही गुणांची नितांत गरज आहे, असे रसेल पोटतिडिकीने १९४० साली सांगत होते, कारण त्या वेळी जगाचा प्रवास पहिल्या महायुद्धा कडून दुसर्‍या महायुद्धाकडे सुरू होता.

Tuesday, 16 May 2023

16 मे सामान्यज्ञान | 16 may General knowledge जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती

16 मे सामान्यज्ञान | 16 may General knowledge 

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती


०१) कोणत्या घटकाच्या प्रमाणावरून मानवी त्वचेचा काळेपणा - गोरेपणा ठरतो ?

- मेलॅनिन.


०२) महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ?

- शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार.


०३) मीठ साखर व पाणी यांच्या द्रावणाला काय म्हणतात ?

- जलसंजीवनी.


०४) क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो ?

- तिसरा.


०५) 'भारतरत्न' पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ?

- महर्षी धोंडो केशव कर्वे.

दिवसनिहाय सामान्य ज्ञानाचे प्रश्न पहा. - Click Here

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

दिनविशेष 16 मे - जागतिक प्रकाश दिवस

दिनविशेष 16 मे - जागतिक प्रकाश दिवस


16 मई को वैश्विक स्तर पर अंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस के रूप में मनाया जाता है। यह यूनेस्को का एक आधिकारिक आचरण है, जो केन्द्रीय रूप से प्रत्येक वर्ष प्रकाश का निरंतर मूल्यांकन करता है और इसकी विज्ञान, संस्कृति, और कला, शिक्षा, सतत विकास, संचार और ऊर्जा के क्षेत्र में मुख्य भूमिका है। 16 मई 2020 को संपूर्ण विश्व में दूसरा ‘अंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस’ मनाया गया। यह दिवस विज्ञान, संस्कृतिक कला, शिक्षा और सतत विकास, औषधि संचार और ऊर्जा के विविध क्षेत्र में प्रकाश की भूमिका के उपलक्ष्य में मनाया जाता है। वर्ष 1960 में प्रसिद्ध भौतिकशास्त्री और इंजीनियर थियोडोर मेमन द्वारा लेजर के पहले सफल संचालन की वर्षगांठ के उपलक्ष्य में 16 मई को यह दिवस मनाया जाता है.

दिनविशेष 16 मे - जागतिक कृषी पर्यटन दिवस

दिनविशेष 16 मे - जागतिक कृषी पर्यटन दिवस


आज जागतिक कृषी पर्यटन दिवस. कृषी पर्यटन म्हणजे शाश्वत पर्यटनात अग्रस्थानी आणि पर्यटन रोजगार वाढीस बळकटी देणारा एक पर्यटन प्रकार. एका अर्थाने शहरी जीवनशैलीने ग्रामीण संस्कृतीला मारलेले घट्ट आलिंगन म्हणजेच कृषी पर्यटन असेही आपण म्हणू शकतो. कृषी पर्यटनाला चालना मिळावी म्हणून वर्ष २००९ पासून १६ मे हा दिवस जागतिक कृषी पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. 'संयुक्त राष्ट्रां'च्या 'जागतिक पर्यटन संघटने'कडून त्याला मान्यता देण्यात आली आहे. अमेरिकेत कृषी पर्यटन हा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. अमेरिकेतील मनुष्यबळाचा ६ टक्के इतका हिस्सा कृषी पर्यटनात रोजगार कमवत असतो. भारतात कृषी पर्यटन सुरु करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. आज मितीस महाराष्ट्रात ६०० पेक्षा जास्त कृषी पर्यटन केंद्र अस्तित्वात आहेत. कृषी पर्यटन हा व्यवसाय हा अतिशय जोखमीचा व्यवसाय आहे. कारण यात तुमच्या पर्यटकांची जबाबदारी आणि काळजी तुमच्यावर असते. त्यामुळे अनेक गोष्टींची काळजी घेण्याची गरज असते. कृषी पर्यटनात विशेष घ्यायची काळजी म्हणजे पर्यटकांची सुरक्षितता. पर्यटकांना कधीही असुरक्षित किंवा भीती वाटणे हा धोक्याचा इशारा आहे. 


गावातील आयुष्यातील शांतता, निरागसता आणि निवांत जीवन पद्धती याचा त्यांना पुरेपूर आनंद घेऊ द्या. मात्र कुठेही गावातील गूढ वातावरण, भुतांची भीती, साप, विंचू आणि जंगली प्राणी यांची भीती लोकांना सतावणार नाही याची काळजी घ्या. याच बरोबर गावातील राजकारण, काही कपटी माणसे यांच्या पासून पर्यटकांची काळजी घ्या. एक उत्तम कृषी पर्यटन केंद्र बनवण्यासाठी तुमच्याकडे कौलारू घरं, बैलगाडी, धबधबा किंवा ओहोळ, झरा, तळं, शेत, नदी, विहीर, भरपूर झाडी, गावरान खाद्यपदार्थाची सोय इ. गोष्टी आसपास असणं अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या पर्यटक संख्येवर तुमचा नफा अवलंबून असतो. 


कृषी पर्यटन हा गावात विशेषत: कोकणात अतिशय यशस्वी होईल असा व्यवसाय आहे. त्यासाठी फक्त चिकाटी आणि आपल्या केंद्राचे उत्तम मार्केटिंग करण्याची हातोटी गरजेची आहे आणि त्यातही सतत कुठल्या प्रकारे आणि कोण कोणत्या पर्यटकांना आपण आकर्षित करू शकतो हे सतत शोधत राहणे गरजेचे आहे. तुम्ही तरुण असाल आणि तुम्हाला चार चौघांपेक्षा वेगळे आणि गावात काही करण्याची इच्छा असेल तर कृषी पर्यटनाचा व्यवसाय तुम्हाला साद घालत आहे. 

दिनविशेष 16 मे - गणितज्ञ विनायक लक्ष्मण छत्रे जन्मदिन | Special Day 16th May - Mathematician Vinayak Laxman Chhatre's birthday

दिनविशेष 16 मे - गणितज्ञ विनायक लक्ष्मण छत्रे जन्मदिन

जन्म - १६ मे १८२५ (नागाव,अलिबाग)

स्मृती - १९ मार्च १८८४


आद्य गणिती, आधुनिक भास्कराचार्य विनायक लक्ष्मण ऊर्फ केरुनाना लक्ष्मण छत्रे यांचा जन्म अलिबाग तालुक्यातल्या नागाव येथे झाला. १९व्या शतकात जन्म घेऊन आपल्या कर्तबगारीनं कीर्तिमान झालेल्या प्रभावळीत प्राचीन भारतीय तसेच आधुनिक गणित व खगोलशास्त्र यांचे निस्सीम उपासक केरुनाना छत्रे यांचे नाव घेणं भाग आहे. आई वडिलांना बालपणीच अंतरल्यानं त्यांना शिक्षणासाठी मुंबईस चुलत्याकडं यावं लागलं. त्यांच्यामुळंच केरुनानांना वाचनाची गोडी व कोणत्याही प्रश्नाकडं वस्तुनिष्ठ दृष्टीनं पाहण्याची सवय लागली. उत्तरायुष्यात केरुनानांनी गणितात संपादन केलेल्या लौकिकाची चाहूल त्यांच्या विद्यार्थी जीवनातच दिसू लागली होती. विशेषत: गणित, खगोल आणि पदार्थविज्ञाना सारख्या कठीण शास्त्रात त्यांना पुढं जी गती प्राप्त झाली, त्याचे मूळ त्यांना एल्फिन्स्टन इन्स्टिटय़ूट मध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर नि प्रो.आर्लिबार या व्यासंगी गुरूंकडून मिळालेल्या मूलभूत ज्ञानात सापडते. त्याच्या जोरावर केरुनानांनी प्रगल्भ ग्रंथांचे परिशीलन करून या विषयांवर घट्ट पकड बसण्याएवढे त्यातले प्रगत ज्ञान प्राप्त केले. याच्या जोडीला त्यांची असाधारण बुद्धिमत्ता लक्षात घेतली की, पुढे त्यांनी दाखवलेले अध्यापन कौशल्य आणि सरकारदरबारी त्यांना मिळालेल्या मानाच्या जागा यांचे आश्चर्य वाटत नाही. 


मुंबईस कुलाबा दांडीवर अंतरिक्ष चमत्कार व लोहचुंबक यांचे अनुभव घेण्यासाठी १८४० मध्ये प्रो.आर्लिबार यांनी एक वेधशाळा काढली. तिथे केरुनानांची असिस्टंटच्या जागी नेमणूक करण्यात आली. अवघ्या १५ व्या वर्षी द.म. ५० रु. पगारावर मिळालेल्या या नोकरीत नानांनी पुढली १० वर्ष जागरुकपणे हवामानशास्त्राचे प्रशिक्षणच घेतलं, असं म्हणता येईल. पुढील आयुष्यात कोणतंही तत्त्व अथवा संकल्पना सिद्ध होऊन पडताळा आल्याशिवाय ते स्वीकारीत नसत, याचं मूळ या नोकरीत आढळतं. १८५१ पासून मात्र पुणे कॉलेजचे नॉर्मल स्कूल, पुढे ट्रेनिंग कॉलेज आणि अहमदनगरच्या इंग्रजी शाळेचे हेडमास्तर अशा सरकारी संस्थांतून त्यांच्या बदल्या झाल्या. या प्रत्येक ठिकाणी गणित, सृष्टिशास्त्र व पदार्थविज्ञान हेच विषय ते जरुरीप्रमाणे इंग्रजी व मराठीत सराईतपणे शिकवीत असत. दरम्यान, त्यांनी इंजिनीअरिंग कॉलेजातसुद्धा सृष्टिशास्त्रावर व्याख्याने दिली. मात्र १८६५ पासून सेवानिवृत्तीपर्यंत केरुनाना पुण्याच्या डेक्कन कॉलेजात स्थिरपणे होते. 


प्रोफेसर व शेवटी हंगामी प्राचार्य म्हणून जागोजागी जबाबदारीची पदे सांभाळूनसुद्धा आपल्या अध्यापनात कधी त्यांनी हयगय केली नाही की खंड पडू दिला नाही. मुलांना समजेल अशा सोप्या रीतीने शिकविण्याची त्यांची हातोटी त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी वाखाणलेली आहे. गणिताशिवाय विद्यार्थ्यांना इतर शास्त्रांचे थोडेबहुत ज्ञान देण्यावर त्यांचा कटाक्ष असे. विद्यार्थ्यांने केव्हाही कुठेही शंका विचारली तरी ते हसत-खेळत हरप्रयत्नाने तिची उकल करीत असत. चिपळूणकर, आगरकर या केरुनानांच्या नामवंत शिष्यांच्या चरित्रात व ते दिवंगत झाल्यावर खुद्द आगरकरांनी लिहिलेल्या मृत्युलेखात त्यांचे विद्याव्यासंग, अध्यापन कौशल्य, स्वभावातील सौजन्य तसेच गरजू व गरीब विद्यार्थ्यांना आसरा देणे, प्रसंगी फी-पुस्तकांची त्यांची नड भागवणे, या गुणांचे प्रामुख्याने उल्लेखआलेले आहेत. त्यांनी केलेल्या आर्थिक मदतींचे ठळक उदाहरण म्हणजे, पहिल्या वर्षांच्या परीक्षेची फी भरायला आगरकरांजवळ पैसे नव्हते म्हणून एक नाटक लिहून ते, ती उभी करणार असल्याचं कळल्यावर केरुनानांनी नाटकाचे कागद काढून घेऊन त्यांची फी भरून टाकली. 


मेजर कँडीच्या मराठीतून शाळेय पुस्तकं तयार करण्याच्या उपक्रमात केरुनानांनी सुबोध भाषेत लिहिलेली पुस्तकं लोकप्रिय झाली. अंकगणितात मूलभूत क्रियांबरोबर कर्जव्यवहार, रोखे, सुतार व गवंडी यांच्या कामाची आकारणी इत्यादी व्यावहारिक उदाहरणे घातली आहेत. तर पदार्थविज्ञानात आजूबाजूच्या सृष्टीत घडणारे व्यापार, निसर्ग चमत्कार व पदार्थाचे गुणधर्म यांच्या परिचयाबरोबर प्रयोगासाठी लागणाऱ्या वस्तू व त्यांच्या किमती पुस्तकाच्या परिशिष्टात दिल्या आहेत. कधी कधी या पुस्तकात त्यांनी संवादाचे माध्यमही वापरले आहे. शास्त्रीय ज्ञान स्वभाषेत व्यक्त करण्यासाठी मुंबईत स्थापन झालेल्या, ‘ज्ञान प्रसारक सभे’च्या व्यासपीठावरून केरोपंतांनी हवा, भरतीओहोटी, कालज्ञान, सूर्यावरील डाग आणि पर्जन्यवृष्टी यांचा संबंध असे विविध विषयांवर १७ निबंध वाचले. त्यापैकी भरती-ओहोटीच्या निबंधात, भरती अंतराच्या घनाच्या प्रमाणात कमी होते असे कलनाच्या मदतीने त्यांनी दाखवलं आहे. 


केरुनानांनी लक्ष घातलेला आणखी एक विषय म्हणजे पंचांग शुद्धीकरणाचा. आपल्या सूक्ष्म अभ्यासाने त्यांच्या असं लक्षात आलं की, परंपरागत पंचांगात केलेलं अशुद्ध गणित व घेतलेली ग्रहस्थितींची स्थूलमाने या चुकांमुळं ऋतुकाल तसंच पंचांगात दाखवलेल्या ग्रहस्थितीचा प्रत्यक्षातल्या ग्रहस्थितीशी मेळ बसत नाही. वेधशाळेतील नोकरीमुळे ग्रहांचे वेध घेण्याची कला त्यांना अवगत होती. तेव्हा ही विसंगती दूर करण्यासाठी त्यांनी पंचांग सुधारण्याचे जे प्रयत्न केले त्याच्या तपशिलात न जाता एवढं म्हणणं पुरेसं ठरेल की, केरुनानांनी या कामी बरेच दिवस आपला बहुमोल वेळ खर्च केला. पण त्यांच्या हयातीत हा उद्योग पूर्णत्वास गेला नाही. मात्र लो.टिळकांसारख्या त्यांच्या नामवंत शिष्यानं राजकारणाच्या धकाधकीतही गुरुऋण जाणून व स्वत:स त्यात असलेला रस म्हणूनही ही चळवळ पुढं नेली. 


केरुनानांच्या पुरोगामी विचारसरणीचे द्योतक म्हणजे स्त्रियांच्या सामाजिक सुधारणेस त्यांचा पाठिंबा होता. शिवाय ते मुलींच्या शाळेच्या व्यवस्थापक मंडळावर होते. श्रीमती रमाबाई रानडे यांच्या प्रेरणेने भरणाऱ्या स्त्रियांच्या सभांना हजर राहून त्यांचे शिक्षण करत. स्त्रियांना जड विषयांऐवजी गृहजीवनोपयोगी शिक्षण देण्याच्या मताचे ते होते. मात्र गहन विषयांच्या व्यासंगात गढलेल्या केरुनानांना शास्त्रीय संगीत, संगीत नाटके व स्वत: पियानो वाजवण्याची आवड होती. शिवाय किर्लोस्कर नाटक मंडळीत त्यांचा राबता होता. फार काय नाटकांच्या तालमींना हजर राहून ते मोरोबा वाघोलीकर आणि बाळकोबा नाटेकर या गायक नटांना गाण्याच्या अतिरेकानं नाटकाचा रसभंग होतो, असा सल्ला देत असत. त्यांच्या या गुणांवर लुब्ध होऊन अण्णासाहेब किर्लोस्करांनी आपले ‘सौभद्र’ हे नाटक त्यांना अर्पण केलेलं आहे. केरुनाना छत्रे यांच्याविषयी लिहिताना ‘टाइम्स’नं म्हटलं होतं, ‘‘प्रो. छत्रे यांना युरोपात पद्धतशीर शिक्षण मिळालं असतं तर ते एक युगप्रवर्तक शास्त्रज्ञ म्हणून गाजले असते.’’

दिनविशेष 16 मे - मराठा सेनानी मुरारबाजी देशपांडे स्मृतिदिन | Maratha fighter Murarbaji Deshpande Memorial Day

दिनविशेष 16 मे - मराठा सेनानी मुरारबाजी देशपांडे स्मृतिदिन

स्मृती - १६ मे १६६५ (सातारा)


महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजी देशपांडे यांचे मूळ गाव. १६६५ साली मोगलांनी पुरंदर किल्ल्याला घातलेल्या वेढ्यात त्याने मराठा सैन्याचे नेतृत्व करत कणखर झुंज दिली. मात्र १६ मे १६६५ रोजी मोगलांनी केलेल्या सुलतानढव्याचा प्रतिकार करताना त्यांस वीरमरण आले. जावळीच्या चंद्रराव मोर्यांशी झडलेल्या संघर्षात शिवाजीराजे भोसले यांना मोर्यांच्या सैन्यातून लढणाऱ्या मुरारबाजी यांच्या युद्धकौशल्याचे विलक्षण कौतुक वाटले. स्वराज्य निर्मितीच्या लढ्यात अशा शूर मावळ्याचा उपयोग होईल हे जाणून जावळीच्या विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरारबाजी देशपांडे यांना मराठा सैन्यात दाखल करून घेतले. स्वराज्यावर औरंगजेबाचे सरदार मिर्झाराजे जयसिंह ह्याच्या रूपात नवीन संकट घोंगावत होते. मिर्झाराजांनी ज्याप्रकारे महाराष्ट्रावर आक्रमण केले त्यापुढे मराठी सैन्याचा टिकाव लागणे फारच अवघड होते, या नामुष्कीची चाहूल लागताच शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे सोबत बोलणी सुरू केली, पण मिर्झाराजांनी महाराजांना दाद दिली नाही. त्यानंतर मोगल सरदार दिलेरखानाने १६६५ साली घातलेल्या पुरंदराच्या वेढ्यात मुरारबाजीने गडावरील सैन्यास घेऊन किल्ला झुंजवायची शर्थ केली. या कठीण परिस्थिती मध्ये देखील मुरारबाजी देशपांडे (महाडकर) यांनी पुरंदर फार शर्तीने लढवला. अवघ्या सातशे मावळ्यांनिशी दिलेरखानाच्या पाच हजार फौजेच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या मुरारबाजीचा १६ मे १६६५ रोजी या लढाईत अंत झाला.

May 16 - Revolutionary Balkrishna Chafekar Memorial Day | दिनविशेष - १६ मे - क्रांतिकारक बाळकृष्ण चाफेकर स्मृतिदिन

दिनविशेष - १६ मे - क्रांतिकारक बाळकृष्ण चाफेकर स्मृतिदिन

जन्म - १८७३ (पुणे)

स्मृती - १६ मे १८९९


क्रांतीकारक बाळकृष्ण चाफेकर यांचा आज बलीदान दिन. वडील ‍हरिपंत पुणे व मुंबईत हरिकथा सांगायचे. त्यांमुळे चाफेकर बंधूंच्या शिक्षणात खंड पडला. बालवयात तिघेही चाफेकर बंधू हरि कीर्तनात वडिलांना मदत करायचे. पुण्यातील राजकीय घडामोडींनी प्रेरीत होऊन चळवळीकडे वळले. ब्रिटिशांनी आणलेल्या संमती वयाच्या विधेयकास त्यांचा तीव्र विरोध होता. भारतीय संस्कृतीत हस्तक्षेप करणाऱ्या ब्रिटीशा बिरूद्ध टिळकांनी केसरी मधून घणाघाती प्रहार करायला सुरूवात केली होती. या आवाहनाने तीनही भाऊ प्रेरित झाले. त्यांनी लोकसंघटन केले. याचवेळी पुण्यात प्लेगच्या साथीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याने ब्रिटिशांनी वॉल्टर चार्ल्स रॅडला भारतात पाचारण केले. रॅडचे प्लेग रोग निवारण करण्याच्या नावाने अत्याचाराचे सत्र सुरु झाले. रॅडने सामाजिक पायदंड पायदळी तुडवून लोकांचा असंतोष ओढवून घेतला. यामुळे चाफेकर बंधूच्या मनात ब्रिटिशाविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला. या साऱ्याचा सूड घेण्याची योजना त्यांनी तायर केली.


त्यावेळी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा हीरकमहोत्सव यावेळी साजरा करण्यात येत होता. सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती. तसेच मेजवानी चे आयोजन करण्यात आले होते. दामोदर चाफेकर या तरुणाने गाडी काढली व गणेश खिंड येथे वाट पाहत २२ जून १८९७ सालच्या मध्यरात्री निवास्थानातून बाहेर पडलेल्या रॅड ह्याचेवर जवळून गोळ्या झाडल्या. रॅड हा काही काळ कोमात राहिला व कालांतराने ३ जुलै १८९७ रोजी मरण पावला.


याचवेळेस दामोदराच्या भाऊ बाळकृष्णाने रॅड सोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या. चाफेकर बंधु निसटण्यास यशस्वी झाले तरी नंतर तिघाही भावांना पकडण्यात आले. दामोदराला मुंबईत अटक झाली व १८ एप्रिल १८९८ रोजी त्यास फासावर चढवण्यात आले. त्यापाठोबाठ वासुदेवाला ८ मे १८९९ व बाळकृष्णाला १६ मे १८९९ रोजी फासावर चढवण्यात आले. व चाफेकर बंधूही शहीद झाले. बाळकृष्ण चाफेकर यांना विनम्र अभिवादन !

16 may 2023 today's educational news आजच्या शैक्षणिक बातम्या

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संबंधित 16 मे 2023 आजच्या शैक्षणिक बातम्या 16 may 2023 Today's Educational News


शिक्षक बदली धोरणाबाबत अभ्यास गटांनी सुचवले नवीन बदल पहा. कसे असेल नवीन बदली धोरण

शिक्षक बदली पोर्टल वेबसाईट 

https://ottportal.mahardd.in/




शालेय शिक्षण अपडेट्स - Trending Post

1) जिल्हा परिषदेतील गट-क संवर्गाची रिक्त पदे भरण्याबाबत अभ्यासक्रम आराखडा, प्रश्नपत्रिका स्वरुप, दर्जा, काठिण्यपातळी बाबत शासन निर्णय

2) Saral Student Portal update | स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थ्यांचे आधारकार्ड करा वैध, तरच संच मान्यता. - Click Here

3) शालार्थ प्रणाली मधून पगार पगारपत्रक (payment slip) कसे डाउनलोड करावे? Step by step Guide and video

4) शिक्षक प्रेरणा परीक्षा आयोजन व संनियंत्रण आणि अभ्यासक्रम आराखडा.


5) स्वाध्याय उपक्रम लिंक - Click Here

6) संच मान्यता 2022-2023 अपडेट | Sanch Manyata 2022-23 

7) शैक्षणिक वर्ष 2023 24 साठी इयत्ता पहिली मध्ये दाखल करावयाच्या मुलाच्या जन्मतारखेबाबत वयाबाबत शासन निर्णय - Click Here

8) शाळा पूर्वतयारी अभियान मेळावा क्र. 1 व 2 चे आयोजन कसे करावे? उपयुक्त PDF पहा.


दिनांक 16-05-2023 

आजच्या शैक्षणिक बातम्या


Touch on Image to Read Clearly


सर्व शाळांना 2 मे पासून सुट्टी, नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होणार 15 जूनपासून - शासन निर्णय पहा. 


दिनांक- 16-05-2023



पेपर मधील बातम्यांची कात्रणे WhatsApp वर मिळविण्यासाठी 
Join Educational News WhatsApp Group

मागील दिवसांच्या दिवसनिहाय शैक्षणिक बातम्या वाचण्यासाठी येथे टच करा.(up-to-date) - Click Here
















1
याप्रमाणे तुमच्या फोटोसह सुविचार मिळवण्यासाठी, शालेय शिक्षण मध्ये सामील व्हा,
 येथे क्लिक करा 👇👇 - कुटुंब अ‍ॅपद्वारे संचालित.




























परिपाठासाठी उपयुक्त आजच्या बातम्या वाचा.
News in Short


#parenting Tips








































































































































































































































👇


यापूर्वीच्या मागील दिवसांच्या दिवसनिहाय शैक्षणिक बातम्या वाचण्यासाठी येथे टच करा.(up-to-date) - Click Here


शालेय शिक्षण अपडेट्स - Trending Post












दिनविशेष :- 16 जून - वर्ल्ड रिफिल डे

दिनविशेष :- 16 जून - वर्ल्ड रिफिल डे संपूर्ण वर्षभराचे दिनविशेष पहा. Click Here टिकाऊ पर्यायांचा अवलंब केल्याने कचरा कमी होतो, संसाधनांचे सं...